गावाविषयी माहिती
पिंजाळ नदी नदीच्या संगमावर आखाडा हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे.आखाडा गावात विठ्ठल रखुमाई ,गावदेवी मंदिर , वाघोबा मंदिर हि धार्मिक केंद्रबिंदू आहेत. तसेच गावालगत पांडव कालीन भोपतगड(बबदगड) हा किल्ला आहे .सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे ११९९ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा २, अंगणवाडी केंद्रे ४ ,समाज मंदिर ४ अशी शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत.तसेच गावामध्ये सन २०२३ पासून पिण्याच्या पाण्याच्या सोईने ग्रामपंचायत आखाडा येथील ग्रामस्थ पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात,तसेच गावात पुरातन मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून मोगरा हे ही प्रमुख पिके घेतली जातात.
आखाडा ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत गावात सार्वजनिक आणि वैक्तिक शौचालये बांधली आहेत.जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. तसेच तंटामुक्ती गाव मोहीम अंतर्गत देखील उत्कृष्ट काम केले आहे.
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ७ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणला आहे. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
आखाडा गाव आज वाडा तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.